Crop Insurance Maharashtra

Crop Insurance Maharashtra 2023 : शेतकर्‍यांना पीक विमा निश्चित मिळेल – कृषीमंत्री धनंजय मुंडे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance Maharashtra: शेतकरी मित्रांनो, नुकतेच संपलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची रक्कम मिळाली नसल्याबाबत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना कृषीमंत्री श्री. धनंजय मुंडे यांनी काही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

त्याचविषयी थोडक्यात माहिती आपण आजच्या ह्या लेखात पाहणार आहोत.

 

अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा GR आला, पहा अशी असेल योजनेची पात्रता आणि कार्यपद्धती

Crop Insurance Maharashtra

शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपनीला या नुकसानाची माहिती 72 तासांच्या आत देण्याचा नियम आहे. यात बदल करून किमान 96 तास इतकी मुदत देण्यात यावी, अशा प्रकारची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे, अशी माहिती उत्तर विधानपरिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासांत कृषी मंत्री  धनंजय मुंडे यांनी दिली.

राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची रक्कम मिळाली नसल्याबाबत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना कृषीमंत्री श्री. मुंडे बोलत होते.

पीक नुकसानीची पूर्वसूचना देण्याचा कालावधी वाढवणार

अतिवृष्टी सारख्या संकटाच्या काळात वीज पुरवठा खंडित असणेइंटरनेटची सुविधा बंद असणेमोबाईल नेटवर्क नसणे अशा प्रकारच्या अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत या सुविधा पूर्ववत होण्यास काही कालावधी लागतो.

त्यामुळे 72 तासांच्या आत नुकसानीची माहिती देण्यास बहुतांश शेतकरी असमर्थ ठरतात. अशावेळी या कालावधीत आणखी काही तासांची वाढ करून  हा कालावधी किमान 96 तास केला जावाम्हणून केंद्र सरकार कडे मागणी करून त्याचा पाठपुरावा करण्यात येईल. अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

पीएम किसान स्टेट्स चेक करा तुमच्या मोबाईल वरच

शेतकर्‍यांना कमीत कमी 1000 रुपये पीक विमा तरी मिळेलच….

सन 2022 च्या हंगामात एकूण विमाधारक शेतकऱ्यांना 3180 कोटी इतकी पीक विमा रक्कम मंजूर करण्यात आली असून त्यापैकी सुमारे 3,148 कोटी इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे.

तसेच उर्वरित शेतकऱ्यांची विम्याची रक्कम ही 1000 रुपये पेक्षा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा कमीत कमी एक हजार रुपये मिळावा, अशी शासनाची भूमिका आहे.

त्यावर उपाय म्हणून यापुढे शेतकऱ्यांना विम्यापोटी मिळणारी रक्कम 1000 रुपयांपेक्षा कमी असल्यास त्यात उर्वरित रक्कम राज्य शासन देईल व शेतकऱ्यांना कमीत कमी एक हजार रुपये पीक विमा हा निश्चित मिळेलअशी घोषणाही मंत्री श्री. मुंडे यांनी केली.

______________________________

  • अशाच प्रकारच्या शेतीविषयक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा. 👉👉 batamikamachi.com
  • शेतीविषयक माहिती आणि अपडेट्स तुमच्या व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉइन करा. 👉👉 Whatsapp Group

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top