Nuksan Bharpai Maharashtra

Nuksan Bharpai Maharashtra: अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करा: मुख्यमंत्री

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nuksan Bharpai Maharashtra: गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे यासंदर्भात स्वत: मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आढावा घेऊन तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

या लेखात तुम्ही काय वाचाल?

Nuksan Bharpai Maharashtra

राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. सरकार संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे व पंचनामे करावेत असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान

ठाणे, पालघरसह राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. वाशिम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), पैठण, गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.

मुंबई, ठाण्यासह उत्तर-मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असल्याने बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत.

2022 चा पीक विमा आता मिळणारच

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top